Wednesday 19 May 2010

पडद्या मागचा अंक चौथा --विजय पान्ढरीपान्डे

ही लघु कादम्बरी दोन प्रतिभावन्तान्च्या पत्रव्यवहारातून नाट्यक्शेत्रातील घडामोडी,नटकातील पात्रे आणी त्यामागील खरीखुरी व्यक्तिमत्वे यान्च्या बद्दलचे लोकापवाद, प्रवाद, आणी सत्य परिस्थिती यान्चा मागोवा घेते।
यातली मानवी मनाचे वेगळे वेगळे पैलू दखवणारी ,अविनाश नाडकर्णी व आनन्दघन ऊर्फ़ गणपत विष्णु जोशी, यान्ची शब्दिक देवाण घेवाण अतिशय ह्रुद्य आहे। नकळत आपण त्यान्च्या आयुष्यात गुन्तत जातो। प्र्यत्येक पत्रात एक नवी जाणीव, माहिती आणी उत्कन्ठा वाढवणारा शेवट हे लघु कादम्बरी चे वैशिष्ट्य आहे।
नाट्य स्रुष्टीतील काही घटनान्शी, व्यक्तीन्शी या गोष्टीतील घटनान्चे वा पात्रान्चे साधर्म्य लक्शात येते।पण अशा घटना कुठल्याही कला क्शेत्रात पहायला मिळतात. आपण सर्वसामान्य लोक त्याना larger than life असे रूप देतात आणी सामान्य माणसाना असणार्या भावना,आशा आकान्क्शा,आणी जीवन हे सगळेच deny करतात. त्यातले काही आपल्या कलाकारान्बद्दलच्या कल्पनान्प्रमाणे असतील ही पण सगळेच सारखे नसतात ---हेच या कदम्बरीत दाखवून दिले आहे. ते वाचुन, आपण या मनस्वी लोकाना सामान्य माणसाप्रमाणे जगण्याचा हक्क नाका्रतो का? असा सन्देह मनात निर्माण होतो.
पत्रलेखकान्ची आयुष्ये, त्यान्चे भूतकाल,वर्तमान्काल, सुखदुःखे, हे सर्व पण या पत्रामधून उलगडत जाते. शेवट अपेक्शित असला तरि मनात अशी एक इच्छा राहते कि लेखकाने ही गोष्ट आणखी पुढे न्यायला हवी होती. यातच लेखकाचे यश सामावले आहे.

No comments:

Post a Comment