Wednesday 19 May 2010

पडद्या मागचा अंक चौथा --विजय पान्ढरीपान्डे

ही लघु कादम्बरी दोन प्रतिभावन्तान्च्या पत्रव्यवहारातून नाट्यक्शेत्रातील घडामोडी,नटकातील पात्रे आणी त्यामागील खरीखुरी व्यक्तिमत्वे यान्च्या बद्दलचे लोकापवाद, प्रवाद, आणी सत्य परिस्थिती यान्चा मागोवा घेते।
यातली मानवी मनाचे वेगळे वेगळे पैलू दखवणारी ,अविनाश नाडकर्णी व आनन्दघन ऊर्फ़ गणपत विष्णु जोशी, यान्ची शब्दिक देवाण घेवाण अतिशय ह्रुद्य आहे। नकळत आपण त्यान्च्या आयुष्यात गुन्तत जातो। प्र्यत्येक पत्रात एक नवी जाणीव, माहिती आणी उत्कन्ठा वाढवणारा शेवट हे लघु कादम्बरी चे वैशिष्ट्य आहे।
नाट्य स्रुष्टीतील काही घटनान्शी, व्यक्तीन्शी या गोष्टीतील घटनान्चे वा पात्रान्चे साधर्म्य लक्शात येते।पण अशा घटना कुठल्याही कला क्शेत्रात पहायला मिळतात. आपण सर्वसामान्य लोक त्याना larger than life असे रूप देतात आणी सामान्य माणसाना असणार्या भावना,आशा आकान्क्शा,आणी जीवन हे सगळेच deny करतात. त्यातले काही आपल्या कलाकारान्बद्दलच्या कल्पनान्प्रमाणे असतील ही पण सगळेच सारखे नसतात ---हेच या कदम्बरीत दाखवून दिले आहे. ते वाचुन, आपण या मनस्वी लोकाना सामान्य माणसाप्रमाणे जगण्याचा हक्क नाका्रतो का? असा सन्देह मनात निर्माण होतो.
पत्रलेखकान्ची आयुष्ये, त्यान्चे भूतकाल,वर्तमान्काल, सुखदुःखे, हे सर्व पण या पत्रामधून उलगडत जाते. शेवट अपेक्शित असला तरि मनात अशी एक इच्छा राहते कि लेखकाने ही गोष्ट आणखी पुढे न्यायला हवी होती. यातच लेखकाचे यश सामावले आहे.

Wednesday 12 May 2010

रुद्र--लेकाख विलास सारन्ग.

पुराणकाळातील किम्बहुना त्याही पूर्वीच्या वेदकाळातील घटनान्चा आजच्या मानसिकतेने विचार करून त्याचे स्पष्टीकरण करायचा प्रयत्न लेखकाने केला आहे।
मूळ गृहीतक आहे माणसाचे आदिम पाप---
सारन्गान्च्या म्हणण्याप्रमाणे ब्रह्मदेवाने प्रथम पुरुष निर्माण केला व नन्तर स्त्री। म्हणजे एक प्रकारे ते दोघे एकमेकान्चे भाउ-बहीण झाले।मग मानव जात वाढवण्यासाठी त्यान्चा सन्ग म्हणजेच पहिले आणी आदिम पाप।आणी सर्व मानव जात ही या पापाची परिणती आहे।मग सगळे जगच पापी। अशा प्रकारचे द्दखले सगल्या धर्माच्या मूळ ग्रन्थामधे मिळतात।। सारन्ग म्हणतात कि देव हे मानवान्हून वेगळे आहेत।्त्याना कसलेच बन्धन नाही।ते फ़क्त आनन्द उपभोगतात!
प्रुथ्वीच्या सुरुवातीच्या कल्लोळातून --आग, तप्त लावा आणी धूर--जन्माला आला काळा कभिन्न असा रुद्र। देवान्चे अबोध मन।(सारन्ग या निश्कर्शा पर्यन्त कसे पोचले ते माहीत नाही)पण म्हणजे गोरे पान, देखणे देवही आतून काळेच आहेत।
रुद्र हा आदी शूद्र पण आहे।(ही सगळी पुस्तकात माडलेली मते आहेत।)देव आपली सगळी क्रुष्णक्रुत्ये त्याच्याकडून करून घेतात।खरे तर तो पशुपति आहे। गाई बैल राखणारा।आणि देवान्न यद्न्यासाठी पुरवणारा, यद्न्यात पशुबळीन्ची हत्या करणार म्हणून तो शूद्र।------
पुस्तकात याच गोषती सान्गणार्या कथा वेगवेगळ्या रीतीने व कालसन्दर्भात लिहिलेल्या आहेत। लेखक पुन्हा पुन्हा पाप सन्कल्पनेवर ही येतो। काही प्राचीन्तर काही अर्वाचीन दखले ही देतो।उद। जन्मजात विक्रुती ह्या बहाउ-बहीण, पिता-पुत्री याच्या समागमामुळे, रक्त शुद्द्ध ठेवत्याच्या अट्टाहासामुळे वाढीला लागल्या। मिश्र समागमामुळे होणारी सन्तती श्रेष्ठ असते।
एकुणच लेखकाला निश्चित पणे काय सान्गायचे आहे याचा बोध होत नाही।अनेक प्रश्नाचे उत्तरेही मिळत नाहीत। उद। ब्रम्हदेवाने एकच स्त्री आणी एकच पुरुष का निर्माण केला?जास्त का नाही? आणी जर ते कोणाच्या उदरातून जन्माला आले नसतील तर ते भाउ बहीण कसे? त्यान्चे ब्लड ग्रूप पण एक नसतील। पशुपति आधी काळा होता मग तो गोरा कसा झाला?
पुस्तकात काहीतरी वेगळे, सन्सनाटी, धक्कदायक लिहायचे एव्हढाच उद्देश दिसतो.