Thursday 7 October 2010

एक प्रवास

एक प्रवास
अनादिपासून अनन्तापर्यन्त्चा
एकच
कारण सध्यातरी तोच माहीत आहे!
पण हां प्रवास केंव्हा -कुठे सुरु झाला?
आणी का?
अन्तराळात विहरणारा आत्मा
प्रुथ्वीवर का अवतरला? त्यालाच यायचे होते,
कि राहिले होते काही देणे द्यायचे?

आला आणी ---
बाकीचे सगळे विसरला।
ईथल्या भवनाट्यात, नात्या-गोत्यात
गुन्तत गेला।
आई-वडिल, भाऊ-बहिणी.....
असन्ख्य नाती आणी अस्न्ख्ह्य गुन्ते!
क्श्णोक्श्णी अनुभवले भावनान्चे तरन्ग
जीवनात ऊचम्बळणारे ्सुख-दुःखान्चे रन्ग।

हा माझा, ही माझी, हे माझे, ते माझे----
किती तो हव्यास
कर्त्रुत्वाचा, विजयाचा आणी सुखाचा
अविरत ध्यास।

आटापीटा,धड्पड सगळीकडे पुरे पडण्याची
प्रत्येकाची ईच्छा ,जरूरत पूर्ण करण्य़ाची।
आणी समाधान ही!

करता करता करता
दिवस गेले, महिने गेले---
कितीक वर्ष ही सरली।
सगळ्याना सगळे भरुन पावले
ज्यान्ना जे पाहिजे ते दिले।

सगळे आपल्या जगात रमले.
कॄतार्थ मी, धन्य मी
याच ठिकाणी, याच वेळी-
जन्म घेतल्याचे सार्थक झाले।

मागे वळून पाहताना
आठव्तात काही क्श्ण।
सुखाचे,दुःखाचे--
आणी हुरहुरीचे सुद्धा।

हेच सन्चित माझे
घेऊन करायचा पुढचा प्रवास
पुन्हा एकदा अन्तराळात जाईपर्यन्त
हेच गाठोडे येईल कामी कदचित
पुन्हा एका नव्या सुरुवातीला---

पण प्रार्थना देवा ऐका माझी लीन
होऊदे माझा आत्मा तुझ्यातच विलीन

Sunday 25 July 2010

असेच काहितरी , सहज सुचले म्हणून !!: पाऊस

असेच काहितरी , सहज सुचले म्हणून !!: पाऊस

पाऊस

नभ उतरु आले ,
जग झिम्माड झाल

खरच आहे, सगळ जगच बदलून जात पाऊस पडायला लागला की. त्याच्या तर्हा तरि किती! झिम झिम अन्गावर तुषार पाडून रोमान्चित करणारा पाऊस, जरा जोराने पडणारा ,हुरहुर लावणारा पाऊस, कोसळणार्या जलधारानी प्रियाची आठवण जागव्णारा पाऊस, आणी प्रिय जवळच असेल तर प्रेमाने चिम्ब करणारा पाऊस! विजेच्या कडकडात कोसळ्णारा, थरार आणणारा पाउस!
पाऊसच पाऊस!
पाऊस आवडत नाही, असे ही महाभाग आहेत. त्याना गालिब सारखे म्हणावेसे वाटते कि ’हाय कम्बख्त! अरे दुर्दैवी माणसा, जरा पावसात भिजून बघ, काय स्वर्गीय आनन्द मिळतो!’
आणी बाहेर पाऊस ,घरात गरम गरम भजी आणी मस्त कोफ़ी या सारखा आनन्द आहे का?

यापेक्शा जास्त मजा फ़क्त आपण घरात आणी बाहेर मस्त बर्फ़ पडत असेल तरच.खिडकीत बसून, हातात वाफ़ाळलेला चहा/कोफ़ी चा कप घेऊन पडणारे बर्फ़ पाहाणे हा अवर्णनीय आनन्द आहे.

Wednesday 7 July 2010

एक हिन्दी कविता देत आहे. ही कविता मी खूप आधी , बहुतेक मुम्बई ब्लास्ट च्या वेळी केलेली आहे.
हम भारतवासी
याद करो वह वचन जो दिया युधिष्ठीर ने
"हम पाच नही, है एकसौ पाच !"
आक्रमण किया अगर हमारे अपनोन्पर किसीने,
मिटा देन्गे उसे----------
अपनोन्पर न आने देन्गे आच.

क्या समझते है दुनियावाले हमको?
हम नही किसीसे डरनेवाले.
अगर उठायेगा हमपर कोई शस्त्र
मत भूलो हमारे पास भी है ब्रम्हास्त्र.

आपसमे हम भले ही लडते हो
क्या भाई- भाई आपसमे लडेन्गे नही?
जितना ज्याद लडे -झगडेन्गे
प्यार बढेगा उतनाही.
एक दूसरेसे बन्धी सीध प्यार की
पक्की बनेगी उतनीही.

दुनिया यह ना समझे-हम कमज़ोर है
आपसमे भले ही हम लडे
दुनियाके लिये हम एक है-
क्या इतिहास ने बार बार नही जताया है?

याद करो आक्रमण चीन का
या फ़िर आक्रमण जो हुए सरहद्पर ,
हमेशा ही भारत की जनताने आवाज उठाई है
आक्रमणकारी को मुह की खानी पडी है.

आज भी अगर कोइ चाहता है आजमाना
करे आक्रमण -उत्तर देगी हमारी एकता
पीछे नही हटेन्गे हम
यह नही हमार धर्म
सहिष्णुता को हमारी कमजोरी मत समझना
पछताना पडे ऐसा काम न करना
हम है हिम्मतवाले, हम है बलवान
शान्तिप्रिय हम-परन्तु है जाग्रुत आत्मसम्मान.

अगर किसी भाई को हमारे
लगी चोट जरा सी
पूरा भारत गरज उठेगा
इसमे न भूल जरासी.

ललकारो ना हमारी वीरता को
पहचानो निद्रिस्त गजराज को
अगर इसे छेडोगे
तबाही मचायेगा
आसमन्त सर्व ध्वस्त कर देगा.

दुनिया याद रखे सदा
भारतवासी है हम
शान्तिप्रिय सह्जीवन का हमारा नारा
हमे है प्र्यार दुनियासे-
लेकिन भारत सबसे प्यारा.



Wednesday 19 May 2010

पडद्या मागचा अंक चौथा --विजय पान्ढरीपान्डे

ही लघु कादम्बरी दोन प्रतिभावन्तान्च्या पत्रव्यवहारातून नाट्यक्शेत्रातील घडामोडी,नटकातील पात्रे आणी त्यामागील खरीखुरी व्यक्तिमत्वे यान्च्या बद्दलचे लोकापवाद, प्रवाद, आणी सत्य परिस्थिती यान्चा मागोवा घेते।
यातली मानवी मनाचे वेगळे वेगळे पैलू दखवणारी ,अविनाश नाडकर्णी व आनन्दघन ऊर्फ़ गणपत विष्णु जोशी, यान्ची शब्दिक देवाण घेवाण अतिशय ह्रुद्य आहे। नकळत आपण त्यान्च्या आयुष्यात गुन्तत जातो। प्र्यत्येक पत्रात एक नवी जाणीव, माहिती आणी उत्कन्ठा वाढवणारा शेवट हे लघु कादम्बरी चे वैशिष्ट्य आहे।
नाट्य स्रुष्टीतील काही घटनान्शी, व्यक्तीन्शी या गोष्टीतील घटनान्चे वा पात्रान्चे साधर्म्य लक्शात येते।पण अशा घटना कुठल्याही कला क्शेत्रात पहायला मिळतात. आपण सर्वसामान्य लोक त्याना larger than life असे रूप देतात आणी सामान्य माणसाना असणार्या भावना,आशा आकान्क्शा,आणी जीवन हे सगळेच deny करतात. त्यातले काही आपल्या कलाकारान्बद्दलच्या कल्पनान्प्रमाणे असतील ही पण सगळेच सारखे नसतात ---हेच या कदम्बरीत दाखवून दिले आहे. ते वाचुन, आपण या मनस्वी लोकाना सामान्य माणसाप्रमाणे जगण्याचा हक्क नाका्रतो का? असा सन्देह मनात निर्माण होतो.
पत्रलेखकान्ची आयुष्ये, त्यान्चे भूतकाल,वर्तमान्काल, सुखदुःखे, हे सर्व पण या पत्रामधून उलगडत जाते. शेवट अपेक्शित असला तरि मनात अशी एक इच्छा राहते कि लेखकाने ही गोष्ट आणखी पुढे न्यायला हवी होती. यातच लेखकाचे यश सामावले आहे.

Wednesday 12 May 2010

रुद्र--लेकाख विलास सारन्ग.

पुराणकाळातील किम्बहुना त्याही पूर्वीच्या वेदकाळातील घटनान्चा आजच्या मानसिकतेने विचार करून त्याचे स्पष्टीकरण करायचा प्रयत्न लेखकाने केला आहे।
मूळ गृहीतक आहे माणसाचे आदिम पाप---
सारन्गान्च्या म्हणण्याप्रमाणे ब्रह्मदेवाने प्रथम पुरुष निर्माण केला व नन्तर स्त्री। म्हणजे एक प्रकारे ते दोघे एकमेकान्चे भाउ-बहीण झाले।मग मानव जात वाढवण्यासाठी त्यान्चा सन्ग म्हणजेच पहिले आणी आदिम पाप।आणी सर्व मानव जात ही या पापाची परिणती आहे।मग सगळे जगच पापी। अशा प्रकारचे द्दखले सगल्या धर्माच्या मूळ ग्रन्थामधे मिळतात।। सारन्ग म्हणतात कि देव हे मानवान्हून वेगळे आहेत।्त्याना कसलेच बन्धन नाही।ते फ़क्त आनन्द उपभोगतात!
प्रुथ्वीच्या सुरुवातीच्या कल्लोळातून --आग, तप्त लावा आणी धूर--जन्माला आला काळा कभिन्न असा रुद्र। देवान्चे अबोध मन।(सारन्ग या निश्कर्शा पर्यन्त कसे पोचले ते माहीत नाही)पण म्हणजे गोरे पान, देखणे देवही आतून काळेच आहेत।
रुद्र हा आदी शूद्र पण आहे।(ही सगळी पुस्तकात माडलेली मते आहेत।)देव आपली सगळी क्रुष्णक्रुत्ये त्याच्याकडून करून घेतात।खरे तर तो पशुपति आहे। गाई बैल राखणारा।आणि देवान्न यद्न्यासाठी पुरवणारा, यद्न्यात पशुबळीन्ची हत्या करणार म्हणून तो शूद्र।------
पुस्तकात याच गोषती सान्गणार्या कथा वेगवेगळ्या रीतीने व कालसन्दर्भात लिहिलेल्या आहेत। लेखक पुन्हा पुन्हा पाप सन्कल्पनेवर ही येतो। काही प्राचीन्तर काही अर्वाचीन दखले ही देतो।उद। जन्मजात विक्रुती ह्या बहाउ-बहीण, पिता-पुत्री याच्या समागमामुळे, रक्त शुद्द्ध ठेवत्याच्या अट्टाहासामुळे वाढीला लागल्या। मिश्र समागमामुळे होणारी सन्तती श्रेष्ठ असते।
एकुणच लेखकाला निश्चित पणे काय सान्गायचे आहे याचा बोध होत नाही।अनेक प्रश्नाचे उत्तरेही मिळत नाहीत। उद। ब्रम्हदेवाने एकच स्त्री आणी एकच पुरुष का निर्माण केला?जास्त का नाही? आणी जर ते कोणाच्या उदरातून जन्माला आले नसतील तर ते भाउ बहीण कसे? त्यान्चे ब्लड ग्रूप पण एक नसतील। पशुपति आधी काळा होता मग तो गोरा कसा झाला?
पुस्तकात काहीतरी वेगळे, सन्सनाटी, धक्कदायक लिहायचे एव्हढाच उद्देश दिसतो.

Monday 22 March 2010

मित्रहो नमस्कार

मित्रहो नमस्कार
आज मी एक ख़ास विषयावर लिहिणार आहे।
मला एरंडे लोकांची माहिती हवी आहे, फेमिली ट्रीकरण्यासाठी।
आम्ही मूलचेशिराम्बे-कोरेगाव सातारा इथले। सासरे अनंत गंगाधर एरंडे, वकील।
काहीही माहिती असल्यास स्मम्पर्क साधा.

Sunday 14 March 2010

काही लोकान्चि माहिती वाचली की मनात दोन भावना उठतात।आपन किति खुजे आहोत--बुद्धी, कर्म(काम), कार्यक्शमता आणी जिद्द- या सग्ल्यातच! आणी मग माणसाच्या उत्तुन्ग कर्तुत्वाची जाणीव होते।
सर्वथा अनुकूल परिस्थितत सम्पादन केलेले यश चान्गलेच असते,पण प्रतिकूल परिस्थित अस्तानाहि जे यशाचे शिखर गाठतात आणि तरीहि पाय जमिनीवर घ्ट्ट रोवून असतात अशा व्यक्तीनबद्दल विशेश आदर वाटतो।
हे सर्व विचार मनात यायचे कारन म्हणजे मि सद्या वाचत असलेले पुस्तक="दुसर्या पीढीचे आत्मकथन"। हे ्पुस्तक ऊज्वला मेहेन्दळे यान्नि उषा ताम्बे,अनुपमा उजगरे,अशोक बेन्खळे,आणी मोनिका गजेन्द्रगडकर यान्च्य सहाय्याने मुम्बई मरठी साहित्य सन्घासाथि सम्पादित केले आहे। याचा पहिला भाग-"एका पिढीचे आत्मकथन" । मि हा भाग वाचलेला नाही पण आता वाचण्याची उत्सुअकता आहे। दुसरी पिढी १९७५ पासून आत्तापरन्त आहे। आणी म्हणूनच आपल्याल परिचित आहे।नवीन पिढीने तर अशी पुस्तके आवर्जून वाचावीत.

Friday 12 March 2010

सुरुवात

सुरुवात---
मरठी ब्लॊग सुरु करत आहे। आधी जे लिहिले ते दुसर्यान्च्या ब्लॊग्वर लिह्ले।
सद्या काही सुचत नाही। पण मी वाचत अस्लेल्या पुस्तकाबद्दल लवकरच लीहीन.