Friday, 16 December 2016

Living life

                                                             
Today, we were discussing with some like-minded people about how things have changed now-a-days. our young generation has in a way lost connection with our relatives, and other close friends of the family,  They all lived in with easy camaraderie. Had no false ideas about `private space'!😞😞😞

We too had nuclear families but still held on to our relations, and at the slightest excuse came together to celebrate. also in case of any difficulty, or problem, all came to help without asking. if anyone was hospitalized, we never had to hire a companion to sit with the patient. And nobody thought that it was a bother! It was all a labour of love! 

Now, the same nuclear family seems to have shrunk to the "we and ours", that is only the husband-wife and their child/children! even first cousins don't seem to be included. Sometimes, if they are living in different cities, they don't even know each other. Leave aside being chummy, or or close to each other. In olden days, most of the times Diwali was celebrated together, all brothers, sisters and their children. They all played, ate and slept together. No private rooms or beds! but it was fun. More importantly, it gave a feeling of togetherness, and a feeling of belonging. In today's world, that is lost. The children have grown apart by distances, their way of living, thinking and in general the fast life that they live in. Idea of their standard of living to matters a lot.

The culture, the special traditions of the family, and on the whole our way of life is the biggest casualty in this transition. The upworldly mobile families have no time for anyone. Not for their parents even. Their faces are turned towards the Western World. Thinking that everything American or European is  the best, they try to emulate their way of life. Little do they realize that now frustrated with their own way of lif, the Americans and the Europeans are turning toward Indian way of life! Now they have realized the importance of the joint family, our way of eating and of-course the Yogasanas. Our young generation will go the gyms and other dance-classes, and make fun of our old practices of `Surya-namaskaar' or yaga. look at the irony of fate!

One good thing probably is that now the the Americans have stated adopting Yoga as the best way of exercise, our young generation may adopt it! The is true about diet too. Now when the rest of the world is praising out `Thali' is the most complete food, it will have some respect  here too.

I really wanted to write more about the relationships, but as the title of my blog suggests, this is `असंच काहितरी सहज सुचलं म्हणून!’ so that is all for today. 



Monday, 26 September 2016

सुख म्हणजे नक्की काय असत?

      सुख म्हणजे नक्की काय असते? कोणास माहीत! कोणी पाहिलय? प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा, अनुभूती वेगवेगळी! पण सगळे सुखाच्या मागे धावत असतात.  पकडून ठेवायचा प्रयत्न करत असतात. आणि ते मात्र मृगजळाप्रमाणे, समोर दिसते, पण पकडायला गेले तर ते तिथे नसतेच! मग ते असते कुठे? आपल्या मनामध्ये? कल्पनेत? की तो एक फक्त आभास असतो? सुख ही एक आपल्या भावनिक अनुभवाची कल्पना आहे. हा अनुभव प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. त्याच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याच्या अनुभूतीची तीव्रता, जाणीवेची तीव्रता, हे सर्व व्यक्तिसापेक्ष आहे. जेव्हढी तीव्रता जास्त, तेव्हढी त्या सुखाची अनुभूती जास्त.आणि हो, या अनुभूतीचीही प्रत्येकाची कल्पना वेगळी वेगळीच!ज्या गोष्टीमुळे एकाला स्वर्गसुखाचा अनुभव येतो, त्याच गोष्टीबद्दल दुसर्‍याला घृणा पण असू शकते.

मग सुख म्हणजे काय? ज्याप्रमाणे अंधाराचा अभाव, म्हणजे प्रकाश असे म्हणतो, त्याच प्रमाणे दुःखाचा अभाव म्हणजे सुख असते का? माहीत नाही, पण सुखाबद्दल एव्हढा सगळा विचार करण्याऐवजी आपण आपल्या सुखाचे क्षण मोजावेत.
 कोणत्याही स्त्रीला विचारा, असह्य प्रसूतीवेदना सहन करून श्रांत-क्लांत झाल्यावरही तिच्या बाळाचे पहिले ’ट्याहा’ तिला स्वर्गसुख देऊन जाते. तो बाळाचा पहिला स्पर्श म्हणजे स्वर्ग सुख नाही तर आणखी काय? पण कितीतरी छोट्या छोट्या गोष्टींमध्येही सुख असते-------
             सुख असते--     वार्‍य़ाच्या मंद झुळकेत,
                                     पावसाच्या पहिल्या शिडकाव्यात,
                                     तापलेल्या धरतीवर पाऊस पडल्यावर दरवळणार्‍या सुगंधात
                                     खिडकीतील मोगर्‍याच्या  सुवासात.
           सुख असते          आपल्या लहानग्यांनी मारलेल्या मिठीत
                                     नवर्‍याच्या कौतुकाच्या नजरेत
                                     मैत्रिणीच्या गुजगोष्टींमध्ये
                                     सर्व आठवणींमधे हरवून जाण्यात!
          सुख असते---       कोणासाठीतरी काहीतरी करण्यात,
                                     सर्वांना पोटभर खाऊ घालण्यात,
                                     'You are the Best!' हे ऐकण्यात,
                                      कोणासाठीतरी स्वतःला हरवून जाण्यात!
          सुख द्यावे --सुख घ्यावे, सर्वांनी सुखी असावे.

Wednesday, 1 July 2015

memories

माझा अविस्मरणीय अनुभव
खरे तर आपल्या जीवनात जे काही बरे वाईट घडते, ते आपण कधीच विसरू शकत नाही. अगदी ठरवून सुद्धा! म्हणजे मग सगळेच अविस्मरणीय, नाही का? पण लोकशाहीत जसे सगळे लोक समान असतात, पण काही काही लोक जरा जास्त समान असतात, तसेच कही काही अनुभव पण जरा जास्त अविस्मरणीय असतात. आता त्यातून एक निवडायचा तर कठीण. पण सध्या एकच पुरे.
      त्यावेळी आम्ही काश्मिरमध्ये रहात होतो. म्हणजे माझे पती त्यांच्या कामाच्या जागी, व्हेरिनाग येथे. अतिशय नयनरम्य ठिकाण आहे. या ठिकाणी झेलम नदीचा उगम आहे. उगमाच्या ठिकणीच नदीचा स्रोत इतका मोठा आहे की त्यावर जवळ जवळ ५० फ़ूट व्यासाचे  २२० फ़ूट खोलीचे अष्टकोनी कुंड बाधलेले आहे. बाजूनी दगडी कमानी आहेत. त्यात सोनेरी आणि रुपेरी रंगांचे दीड, दोन फ़ूट लांबीचे ट्राउट मासे पोहत असतात. अर्थातच तिथे मासे पकडायला बंदी आहे. १० फ़ूट रुंदीचा झेलमचा निर्झर समोर खळखळा वहात असतो. त्याच्या दुतर्फा विविध फुलांनी आणि हिरवळीने सजलेली प्रचंड मोठी बाग आहे. पूर्वी बर्‍याच सिनेमांचे शूटिंग इथे व्हायचे. असे म्हणतात की ही बाग पहिले बांधली आणि मग याच्या धर्तीवर श्रीनगरच्या शालिमार आणि निशात बागा तयार केल्या!
      शेजारी असलेल्या छोट्या टेकडीवर आमचे छोटेखानी बंगले होते. ज्यावेळी सन्‍ १९५८ मध्ये जर्मन लोक जवाहर टनेल बनवत होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या राहण्यासाठी हे बंगले बांधले होते. आता ते बॉर्डर रोड्सच्या ताब्यात होते. त्यांची आखणी पण सुंदर होती. आमच्या स्वतःच्या फुलबागा होत्या. आणि घराच्या मागच्या बाजूला भाजी, शेती इत्यादी. पाहिजे ते लावा.  आम्ही तिथे ७-८च फ़ॅमिलीज होतो.  अगदी चुरशीने विविध फुलांची आणि भाज्यांची लागवण करायचो. अर्थातच, आमच्या प्रत्येकाच्या दिमतीला एक स्वतंत्र माळी होता. रोज सकाळी नवरे लोक ब्रेकफ़ास्ट करून ऑफ़िसला गेले की मग बाहेर पडायचे. माळ्याबरोबर बागेत फेर-फटका. कुठे काय लावायचे, काय खत आणायचे वगैरे वगैरे. म्हण्जे तो अनुभवी असल्यामुळे तो सांगायचा आणि आपण मान डोलवायची. सकाळी त्या सुंदर फुलांचे दर्शन मन प्रसन्न करायचे. मग परसदारी, मुलीच्या समवेत जायचे. ताजी कोवळी गाजरे, लाल मुळे उपटून खायला मजा यायची. घरात सफर्चंद, पेअर, प्लम्स इ.ची पण झाडे होती. मुली झाडांवर चढून फळे तोडून खायच्या. एकूणच अतिशय सुखाचा आणि मजेचा काळ होता. माझेही वय लहान होते. मी फक्त जगातील सौंदर्यच पाहिले होते. खर्‍या जगातील गतिविधींची अजून ओळख व्हायची होती. मी प्रत्येक छोट्या गोष्टीतून आनंद घेण्यात मशगुल होते. खरे तर माझी मोठी मुलगी तेव्हा ७ वर्षांची होती शाळेत घालायला हवे होते. पण मी घरीच तिचा अभ्यास घेत होत. पुढच्या वर्षी एकदम तिसरीत घालण्यासाठी. त्यासाठी मला मुलींना घेऊन श्रीनगरला रहावे लागणार होते. तोपर्यंत आम्ही आयुष्याचा आनंद उपभोगत होतो.
दिवस तसा साधाच होता. आधी सांगितल्याप्रमाणे, सकाळी ब्रेकफ़ास्ट, बागेत फेरफटका, मग अंघोळी आणि कपडे धुणे! हो तिथे कपडे धुवायला कोणी मिळत नाही. आणि मग बाहेर पडायचे. रो कोणातरी एकीच्या घरी जमायचे. सगळ्यांच्या हातात लोकर आणि सुया. थंडीच खू ना तिकडे. थंडीच्या रोज दिवसात ३-४ स्वेटर्स लागायचेच. त्यामुळे कितीही स्वेटर विणले तरी कमीच! रोज नवीन नवीन स्नॅक्स. मजा. १२.३० ल घरी कारण नवरे लोक १ वाजता घरी यायचे. आता जेवण कोण करत होते, हा प्रश्न पडला असेल ना? आमच्या प्रत्येकाच्या घरी एक कुक होता.ते त्याचे किचन होते. आम्हाला तिथे त्याच्या परवानगीनेच प्रवेश! तर १ वाजता जेवण आणि मग वामकुक्षी. ४ वाजता काहीतरी गेमस्‍. बहुतेक बॅड्मिंट्न. किंवा मग मेस मध्ये पत्ते कुटायला. १ पैसा पॉईंट रमी. क्वचित ब्रिज. ६.३०- ७ पर्यंत घरी पार्टी नसेल तर रात्री जेवण आणि झोप.
सुंदर जीवन क्रम होता. पण प्रत्येक गोष्टीला अंत असतोच. माझे हे सुंदर जीवन पण श्रीनगरला  गेल्यावर थांबले असे नाही तर कमी झाले. मुलींच्या शाळा सुरू झाल्या. बाकी सकाळचा दिनक्रम बाग सोडली तर तसाच राहिला. दुपारी मुली घरी आल्यावर त्यांचे खाणे-पिणे, अभ्यास इ.मध्ये वेळ जाऊ लागला. आणि त्यामध्ये मी रमले. तिथे असतांना तर खूपच असे अनुभव आले, जे अविस्मरणीय आहे. ते पुन्हा केव्हातरी.

                          

Thursday, 7 October 2010

एक प्रवास

एक प्रवास
अनादिपासून अनन्तापर्यन्त्चा
एकच
कारण सध्यातरी तोच माहीत आहे!
पण हां प्रवास केंव्हा -कुठे सुरु झाला?
आणी का?
अन्तराळात विहरणारा आत्मा
प्रुथ्वीवर का अवतरला? त्यालाच यायचे होते,
कि राहिले होते काही देणे द्यायचे?

आला आणी ---
बाकीचे सगळे विसरला।
ईथल्या भवनाट्यात, नात्या-गोत्यात
गुन्तत गेला।
आई-वडिल, भाऊ-बहिणी.....
असन्ख्य नाती आणी अस्न्ख्ह्य गुन्ते!
क्श्णोक्श्णी अनुभवले भावनान्चे तरन्ग
जीवनात ऊचम्बळणारे ्सुख-दुःखान्चे रन्ग।

हा माझा, ही माझी, हे माझे, ते माझे----
किती तो हव्यास
कर्त्रुत्वाचा, विजयाचा आणी सुखाचा
अविरत ध्यास।

आटापीटा,धड्पड सगळीकडे पुरे पडण्याची
प्रत्येकाची ईच्छा ,जरूरत पूर्ण करण्य़ाची।
आणी समाधान ही!

करता करता करता
दिवस गेले, महिने गेले---
कितीक वर्ष ही सरली।
सगळ्याना सगळे भरुन पावले
ज्यान्ना जे पाहिजे ते दिले।

सगळे आपल्या जगात रमले.
कॄतार्थ मी, धन्य मी
याच ठिकाणी, याच वेळी-
जन्म घेतल्याचे सार्थक झाले।

मागे वळून पाहताना
आठव्तात काही क्श्ण।
सुखाचे,दुःखाचे--
आणी हुरहुरीचे सुद्धा।

हेच सन्चित माझे
घेऊन करायचा पुढचा प्रवास
पुन्हा एकदा अन्तराळात जाईपर्यन्त
हेच गाठोडे येईल कामी कदचित
पुन्हा एका नव्या सुरुवातीला---

पण प्रार्थना देवा ऐका माझी लीन
होऊदे माझा आत्मा तुझ्यातच विलीन

Sunday, 25 July 2010

असेच काहितरी , सहज सुचले म्हणून !!: पाऊस

असेच काहितरी , सहज सुचले म्हणून !!: पाऊस

पाऊस

नभ उतरु आले ,
जग झिम्माड झाल

खरच आहे, सगळ जगच बदलून जात पाऊस पडायला लागला की. त्याच्या तर्हा तरि किती! झिम झिम अन्गावर तुषार पाडून रोमान्चित करणारा पाऊस, जरा जोराने पडणारा ,हुरहुर लावणारा पाऊस, कोसळणार्या जलधारानी प्रियाची आठवण जागव्णारा पाऊस, आणी प्रिय जवळच असेल तर प्रेमाने चिम्ब करणारा पाऊस! विजेच्या कडकडात कोसळ्णारा, थरार आणणारा पाउस!
पाऊसच पाऊस!
पाऊस आवडत नाही, असे ही महाभाग आहेत. त्याना गालिब सारखे म्हणावेसे वाटते कि ’हाय कम्बख्त! अरे दुर्दैवी माणसा, जरा पावसात भिजून बघ, काय स्वर्गीय आनन्द मिळतो!’
आणी बाहेर पाऊस ,घरात गरम गरम भजी आणी मस्त कोफ़ी या सारखा आनन्द आहे का?

यापेक्शा जास्त मजा फ़क्त आपण घरात आणी बाहेर मस्त बर्फ़ पडत असेल तरच.खिडकीत बसून, हातात वाफ़ाळलेला चहा/कोफ़ी चा कप घेऊन पडणारे बर्फ़ पाहाणे हा अवर्णनीय आनन्द आहे.

Wednesday, 7 July 2010

एक हिन्दी कविता देत आहे. ही कविता मी खूप आधी , बहुतेक मुम्बई ब्लास्ट च्या वेळी केलेली आहे.
हम भारतवासी
याद करो वह वचन जो दिया युधिष्ठीर ने
"हम पाच नही, है एकसौ पाच !"
आक्रमण किया अगर हमारे अपनोन्पर किसीने,
मिटा देन्गे उसे----------
अपनोन्पर न आने देन्गे आच.

क्या समझते है दुनियावाले हमको?
हम नही किसीसे डरनेवाले.
अगर उठायेगा हमपर कोई शस्त्र
मत भूलो हमारे पास भी है ब्रम्हास्त्र.

आपसमे हम भले ही लडते हो
क्या भाई- भाई आपसमे लडेन्गे नही?
जितना ज्याद लडे -झगडेन्गे
प्यार बढेगा उतनाही.
एक दूसरेसे बन्धी सीध प्यार की
पक्की बनेगी उतनीही.

दुनिया यह ना समझे-हम कमज़ोर है
आपसमे भले ही हम लडे
दुनियाके लिये हम एक है-
क्या इतिहास ने बार बार नही जताया है?

याद करो आक्रमण चीन का
या फ़िर आक्रमण जो हुए सरहद्पर ,
हमेशा ही भारत की जनताने आवाज उठाई है
आक्रमणकारी को मुह की खानी पडी है.

आज भी अगर कोइ चाहता है आजमाना
करे आक्रमण -उत्तर देगी हमारी एकता
पीछे नही हटेन्गे हम
यह नही हमार धर्म
सहिष्णुता को हमारी कमजोरी मत समझना
पछताना पडे ऐसा काम न करना
हम है हिम्मतवाले, हम है बलवान
शान्तिप्रिय हम-परन्तु है जाग्रुत आत्मसम्मान.

अगर किसी भाई को हमारे
लगी चोट जरा सी
पूरा भारत गरज उठेगा
इसमे न भूल जरासी.

ललकारो ना हमारी वीरता को
पहचानो निद्रिस्त गजराज को
अगर इसे छेडोगे
तबाही मचायेगा
आसमन्त सर्व ध्वस्त कर देगा.

दुनिया याद रखे सदा
भारतवासी है हम
शान्तिप्रिय सह्जीवन का हमारा नारा
हमे है प्र्यार दुनियासे-
लेकिन भारत सबसे प्यारा.